Saturday, 21 April 2012

मराठी चित्रपट समीक्षण.....मसाला म्हणजे मराठी सिनेमाला खमंग फोडणी... कुलकर्ण्यांचा फर्मास मिडास " टच " ....

मसाला म्हणजे मराठी सिनेमाला खमंग फोडणी...
कुलकर्ण्यांचा फर्मास  मिडास  " टच " .... 

मी काही चित्रपटाला जाणकार वगैरे नाही... मात्र चित्रपटाची आवड जपणारा आणि आवडलेल्या चित्रपटावर भर भरून बोलणारा मात्र आहे...
खूप कमी चित्रपट असतात ज्यांच्या विषयी फेसबुक वर रिकमांड करावा वाटत आणि त्याहून कमी चित्रपट असतात ज्या विषयी ब्लॉग लिहावा असं  वाटतं...
 खरा पाहता उमेश आणि गिरीश हे दोन मस्त कूक मराठी चित्रपटाना मिळालेत...वेगळा सिनेमा देणाऱ्या महेश मांजरेकर, नितीन देसाई आदी महान व्यक्तींच्या पंक्तीत कुलकर्णी जोडी आली.. आणि मराठी चित्रपताना छान तडका मिळणार ह्याची खात्री झाली. भंकस बाष्कळ विनोदी आणि माझं तुझं कुंकू पुसून विट आणणाऱ्या मराठी सिनेमाला कंटाळलेल्या मराठी माणसाला नक्कीच हा दिलासा आहे. 
पारितोषिक, कला , गल्ला... हे तीन बिंदू जमवून त्रिकोण काढणारा हुशार... कारण हा त्रिकोण खूप कठीण आहे...
मात्र प्रेक्षकाच्या भावविश्वात समरस होऊन त्याची नाडी पकडली... कि हा बेत उत्तम जमून येतो असाच ह्यांनी दाखवून दिलंय.. 
मसाला हा चित्रपट खळखळून ओढून ताणून हसवणारा मुळीच नाही.. मात्र चेहर्या वरची स्मित रेषा ढळू न देता अंतर्मुख करतो हे मात्र निश्चित...
प्रामाणिक, धडपड्या गरीब माणसाची गोष्ट ... त्याचा प्रवास...... त्याचा भाव विश्व .... आणि त्यातली निखळता .... हे पाहून आपण समरस होतो.... त्याच्या प्रवासात आपण आपल्याला गुंतवत जातो... त्याच्या यशाने आपण आनंदतो... तो फसला की आपण  नकळत हसतो... पण मनात हलकासा चटका लागतो... हे सर्व का होतं?? याच कारण दिग्दर्शकाने अगदी प्रामाणिक पणाने मांडलेलं विश्व... ते विश्व आपलं वाटण ह्यातच सर्व आलं...आणि ह्याचा क्रेडीट गोज टू....दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कड्डक..

अभिनयाविषयी काय बोलणार... सर्व ग्रेट batsmen   एकाच टीम कडून खेळावा असं प्रकार... दिलीप प्रभावळकर, डॉ.मोहन आघाशे, डॉ.श्रीराम लागू यांनी कमी ओवर्स  मध्ये  जबरदस्त फटकेबाजी केलीय.. अमृता सुभाष तर गोडच... गिरीश साहेबांबद्दल काय बोलावे... थेट ओपनिंग ते सामना जिंकवून देण्यापर्यंत ... तुफान खेळी... बाकी सर्व कलाकारांनी चोख काम केलंय... खास करून हृषीकेश जोशी...  
entrepreneurship , business, management ... वगैरे प्रांतातल्या लोकांनी तर पहावाच...
चित्रपटाचा वेग  २-३ गिअर मध्ये बरोब्बर चालतो... उगाच घिसाड घाई नाही... उगाच ' साचलेपण' नाही... 
'देउळ' ची घंटा देशात वाजवल्यावर उत्तम कामगिरीची जबाब दारी मोठी नक्कीच असणार... मात्र ( देव करो आणि माझ्या तोंडात साखर पडो ) सलग दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची '"मसालेदार" अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.. सामान्य  वाटणारी कथा असामान्य केलीय ती यातल्या संवादांनी...
तेव्हा सर्व मराठी जनहो... हा चित्रपट पहाच... आणि तिकीट काढून पहा... "टोरंत आणि piracy " असला दरिद्रीपणा नवीन मराठी ( आणि दर्जेदार ) सिनेमाच्या बाबतीत करू नका... नाहीतर पुन्हा बोलू नका.. मराठीत चांगला बनवत नाहीत...
" ग्रामीण मराठी सिनेमा आणि शहरी मराठी सिनेमा --- असा भेदभाव दूर करणारा आणि खरा रसिक शोधणारा  हा प्रामाणिक प्रयत्न आहे "
-------- विराज काणेकर 


Wednesday, 18 April 2012

वितळलेले आईस क्रीम..मराठी कविता

जीवन म्हणजे काय हो....
एक आईस क्रीम.....
हातात मिळालेले असताना....
घट्ट असताना .....
नुकतंच उघडताना.....
जस असतं.... तसं नंतर राहत का हो....
अलगद वितळून जात....
आपल्या समोर....
आम्ही पाहत राहतो....
हातावरून ओघळणारे....
पण न सावरता येणारे ओघळ....
मग वाटतं....
आधीच खाल्लं असतं तर....एकटाच ....
.........मजा आली असती....
कुणाची वाट पाहत राहिलो....
कुणीतरी.... शेअर करावा माझ्या जिवनाच आईस क्रीम ....
माझ्या बरोबर....
वाट पाहता पाहता ....
जीवन वितळून जाते....
आधीच चाखायला हवे होते....
मनात वाटत राहते....
आईस क्रीम पुन्हा घेता येते...जीवन नाही....
म्हणजे अजून जीवन तरी विकत मिळत नाही....
वितळून जाते....
----------------------- विराज काणेकर

Saturday, 14 April 2012

डबल ढोलकी....मराठी लेख..

गेले ६ -७ दिवस महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले होते . बायका पोरींनी हंडा घेऊन किलोमीटर भर उन्हात पाण्यासाठी जाणे संपले होते , शेतकरी आनंदित झाले होते, गुन्हेगारांनी सर्व गुन्हे बंद करायचे ठरवले होते. मात्र एक यक्ष प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता. आणि " निरपेक्ष , निस्वार्थी " म्हणून लौकिक असलेल्या आमच्या मिडिया ने त्याचा " सवाल दस करोड " का केलं करून ठेवला होतं. तो प्रश्न म्हणजे बिहार अधिपती नितीश कुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिन साजरा करावा अगर करू नये... आता मुंबईतल पान ( आणि TRP ) नवीन वाघाच्या डरकाळी वर हलत असल्यामुळे सर्व कॅमेरे , माईक चे दांडे दादरच्या गुहेच्या दिशेने रोखले होते. मात्र वाघ काहीच प्रतिक्रिया देत नसल्यामुळे गुहेतून येणारे वेगवेगळे आवाज , प्रतिध्वनी प्रमाण मानून मिडिया ने जाहीर केले ..... आता १५ तारखेला राडाच... जणू महायुद्धच येउनी ठेपले... सध्या वादाला रंग लाऊन दोन राज्यातील युद्ध बनवायचे आणि नंतर 'एक देश' ची टेप लावायची...मिडीयाला हे छान जमत..

दृश्य क्रमांक एक ...

मराठी बातम्यांची स्वयंघोषित नंबर १ वाहिनी ( म्हणजे आम्हीच कसे नंबर १ याचा दावा करणाऱ्या ३-४ वाहिन्यांपैकी एक)

काल पूर्ण " राज"कीय सभा " जिवंत " दाखवल्यामुळे आपलाच कसा TRP वाढला ह्याची खमंग चर्चा चालू असतानाच १५ ला कसे तय्यार राहायचे ह्याची तय्यारी सुरु झाले.
"तू दादर मध्ये थांब, चार पाच तोडफोडीचे shots घे "
" तू बांद्र्याच्या किल्ल्यावर बघ काय हालचाल होतेय..."
" खल फटाक झाली कि तेच rewind forward करून दिवसभर दाखवा "
" मग मुंबई 'त्यांच्यामुळेच ' कशी चालते , कसे कष्ट करतात 'गरीब बिचारे' !!! यावर एक सेग्मेंट होऊदे "
( मला कधीतरी प्रश्न पडतो... आधी मुंबई चालायची नाही का? हे गरीब बिचारे!!! मग मराठी माणूस काय लोखंड वाला , लोधा चा पत्ता सांगतो का?हे कष्ट करतात.. आंम्ही काय गोट्या खेळतो का?)

पण सर्वात महत्वाची तय्यारी म्हणजे संपादकांची चालू होती... सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे " आजचे ठोक ठोक प्रश्न " .....
त्यांनी अनुभवावरून आधीच पक्का केलं ... " खल फटाक नक्की " मग त्यावर पुढचे सर्व...
" उगला जहर..., लोकशाहीचा खून, गरिबांवर अन्याय, ह्या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो, साधन संपत्तीची तोड फोड ,गुंड प्रवृत्ती पासून ते थेट अटक करा इथपर्यंत 'पंच' कसे मारायचे ह्याची उजळणी झाली... 'त्या' विचारांचे पाहुणे बोलावणे झाले..."
पण घात झाला...

अचानक " साहेबांनी" निर्णय बदला... दोन सेनापती एक मेकांशी बोलले... बिहार दिन नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम , सुरवात महाराष्ट्र गीताने होईल , राजकीय stetments नाहीत ...या तहावर मान्यता झाली...

" शिट शिट "... संपादकांनी मूठ आपटली...
१५ तारखेचा फुल डे शो रद्द...
" यांच टायमिंग काय कळतच नाही... , आमच टायमिंग बदलून जात
पण हार मानायची नाही... चला ... नवीन सेग्मेंट घ्या.."
' साहेब घाबरले? . मराठी अस्मिता कुठे गेली, आता मराठी माणसाच काय होणार, आर्थिक बोलणी झाली का, पासून ते थेट राडा केलं असता तरच महाराष्ट्र वाचला असता.. आता नाही.. इथपर्यंत मजल गेली'
काल पर्यंत " अहिंसा, लोकशाही , एकात्मता... यावर थाप मारणारी मिडिया आता राडा होनेकोईच मंगता था ..या बाजूला गेली..."


आमचा तिकीट संपला होतं... नाटक छान झालं... डबल ढोलकी कशी वाजते याचा काय मस्त उदाहरण दिलाल. आमचा वेळ आणि पैसा वसूल... कोण म्हणतं IPL चालू असताना इतर काही चालत नाही...??
गान छान लागल होतं रेडिओवर... " कुच्छ तो मिडिया कहेगी... मिडिया का काम हे केहना..." reemix असेल बहुदा...

विराज काणेकर